(विष्णू खंदारे,पुसद)
:- देशाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने ज्या ज्या महापुरूषांनी देश उभारणीत मोलाचे बहुमोल असे योगदान दिले त्यांच्या कार्यामुळे देश मजबुत उभा राहिला आणि संपूर्ण जगात देशाचे नाव उज्ज्वल करण्यात मोलाचा वाटा आहे अशा थोर महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात दहा महापुरुषांच्या जन्मगावांचा प्रस्ताव तयार झाला आहे.
सामाजिक सलोखा, लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने थोर महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे बहुमोल कार्य या माध्यमातून समाजा सोबतच देशाच्या स्वातंत्र्यात समता योगदान असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्मगावांचा या प्रस्तावात समावेश आहे. या महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा आधुनिक होतील. सुसज्ज इमारती आधुनिक सोयीयुक होऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल . या महापुरूषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असेल, असा या उपक्रमा मागचा हेतू आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने भविष्यातील नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श समोर उभा राहून योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे यासाठी या शाळांचा विकास करण्यात येणार आहे.