बारावीचे विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी आवेदनपत्रे भरू शकणार!

212


राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय


हिंगणघाट (२८/४) :- यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळानं बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अद्याप बारावीच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
प्रभाकर कोळसे
हिंगणघाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here