शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: विद्यार्थी पर्यावरण प्रेमी बनावा या उद्देशाने पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त उपक्रम तयार केला आहे. या उपक्रमाची शालेय शिक्षण विभाग कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी पूर्ण करेल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्याच्या पर्यावरण व वातावरणातील बदल विभागाने युनिसेफच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणातील बदल म्हणजे नक्की काय व त्याचे परिणाम आणि आपण त्यासाठी काय करायला हवे याबाबत माहिती देणारा अभ्यासक्रम ‘माझी वसुंधरा’ तयार केला आहे.
हा अभ्यासक्रम पूर्णता तयार करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तो शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्त केला. यावेळी त्या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेन्ट महा संचालक जयराज फाटक, युनिसेफचे राजलक्ष्मी, युसुफ, माझी वसुंधरा चे अभियान संचालक सुधाकर बोबडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
❓ ‘माझी वसुंधरा’ च्या माध्यमातून अभिनव उपक्रम
पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वातावरणीय बदलाविषयी भावी पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने शालेय व शिक्षण विभागाचा अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता नववीच्या पुढे असा हा अभ्यासक्रम आधी शिकवला जातो. परंतु आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण व्हावी म्हणून नवीन अभ्यासक्रम एक आकर्षण ठरणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमाकरिता समिती कार्यरत केलेली आहे. त्यामध्ये पर्यावरण विषयक तज्ञांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शिक्षण हे मातृभाषेतून मिळणे अनिवार्य आहे तथापि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणी येऊ नये या दृष्टीने इयत्ता पहिली पासून ते द्विभाषिक अभ्यासक्रम शिकवण्याची नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
❓ आदित्य ठाकरे म्हणाले वातावरणातील बदल बाबत आजच कृती आवश्यक.
अभ्यासक्रमाची आवश्यकता किती आहे याबाबत महत्त्व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदल हा आता जागतिक प्रश्न बनला असून ती प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध मार्गांचा प्रयत्न करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार असलेला अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग असून विद्यार्थ्यांना बालपणापासून पर्यावरणाविषयी व त्यातील होणाऱ्या बदलांविषयी करावयाच्या उपाययोजना विषयी माहिती होणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरणीयबदल ही गंभीर बाब असली, तरी त्यातून स्वतःला वाचवायचे असेल तर पर्यावरणातील काही समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आजपासून कार्य करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगी कारणे अत्यंत गरजेचे आहे असे ते म्हणाले.