शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: राज्यातील शाळा सुरू कधी होणार? याचे उत्तर जाणण्याची प्रत्येकात उत्सुकता होती. परंतु आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच 01 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या कोरणा संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्षाहून अधिक काळ हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा केली.
शाळा सुरू होणार म्हणजे चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार हे नक्कीच.
इयत्ता 5वी ते 12वी शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता 1ली ते 4थी चे वर्गही ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने परवानगी दिली होती. त्या सोबतच राज्याची कोविड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत हिरवी झेंडी दाखवली होती. आता राज्यात covid-19 संक्रमण ग्रस्तांची संख्या मागील काही महिन्यात सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कारणाने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने कोरोना बाबत निर्बंध शिथिल करत आणले आहेत.
▪️शाळा सुरू करण्यासाठी करावे लागेल खालील नियमांचे पालन▪️
▫️शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
▫️शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे.
▫️ विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
▫️ कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
▫️ विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास किंवा तशी लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
▫️ विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करावी.
▫️ शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे.