दिवाळीनंतर पहिली ते चौथीच्या शाळांची घंटा वाजणार‌!

341


कोरोनाची दुसरी लाट ओसरली,कृती‌ आराखड्याची तयारी सुरू

हिंगणघाट (१६/१०) पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याची माहिती आहे.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली असून १ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यानच्या १५ दिवसांत राज्यभरात कोरोनाचे ३२ हजार ३१९ रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे ५० हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचण्याची मोहीम जोरदार सुरू असल्याने मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. मुंबई महापालिका, नगर, पुणे, सोलापूर व सातारा जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला आहे.
दरम्यान, सध्या शहरातील आठवी ते बारावीचे तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीच्या ऑफलाईन शाळा सुरू आहेत. राज्यातील जवळपास ४५ हजार शाळा सुरू झाल्या असून ६५ लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत दररोज हजेरी लावत आहेत. कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू आहेत. दुसरीकडे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सध्या सुरू नाहीत. तरीही, कोरोनाचे नियम पाळून शहर-ग्रामीणमधील लाखो विद्यार्थ्यांना विशेषत: ज्यांच्याकडे ॲन्ड्रॉईड मोबाइल नाहीत त्यांना ऑफलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. दुसरीकडे शहरातील शाळांवरील निर्बंध शिथिल करून कोरोनामुक्‍त प्रभागांमधील सर्वच शाळा सुरू होणार आहे.
प्रभाकर कोळसे
हिंगणघाट

सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्याची थकबाकी देण्याबाबत मा.शिक्षण संचालयाचे पत्र👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here