शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.या संदर्भात परीक्षा परिषदेने अधिकृत पत्राद्वारे घोषणा केली आहे.या संदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांनी ट्वीटरद्वारे पुढील प्रतिक्रिया नोंदवली
यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण ४७६६२ शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता ५वीचे ३८८३३५ तसेच इयत्ता ८ वीचे २४४१४३ असे एकूण ६३२४७८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी हीच आमची प्राथमिकता आहे.