शशिकांत इंगळे , अकोला
वार्ताहर) राज्यात उच्च प्राथमिक विभागाच्या 15 हजार जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी आता सीईटी ची तारीख पुढल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत.
राज्यातील 15 हजार शिक्षकांची भरती ही बी.एड पदवीधारकांसाठी असणार आहे. येत्या आठवड्यात वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्यास भरती 2022-23 या शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या शिक्षकांचा ताण कमी केला जाऊ शकतो. कोरोना काळामध्ये 2018 नंतर शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यामुळे राज्यातील रिक्त जागा ह्या 15000 वर पोहोचले आहेत. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. भरती प्रक्रिया केल्यास 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांची कमतरता भरून काढली जाणार आहे. या शिक्षक भरतीसाठी उमेदवाराचे बी.एड पूर्ण असणे बंधनकारक आहे CET मध्ये जास्तीत जास्त गुण, गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारे ही भरती पूर्ण केली जाणार आहे आहे. यापूर्वी सात जिल्ह्यांमध्ये पाच हजार शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. सरकारी प्राथमिक- माध्यमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा याकरिता सीईटी पास झाल्यानंतर थेट नियुक्ती दिली जाणार आहे.
राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी नव्याने चालना मिळाली असून मात्र डी.एड झालेल्या शिक्षकांना भरती होत नसल्याने केवळ बी.एड. धारक शिक्षकांना संधी मिळत आहे. पहिली ते पाचवी पर्यंत रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागा डी.एड शिक्षकांसाठी नेमण्यात येत असतात. परंतु डी.एड शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया केली नाही. त्यामुळे यावेळीही डी.एड धारकांवर अन्याय होणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षक भरती करण्यासाठी लवकरच भरती घ्यावी अशी मागणी डी.एड धारक करीत आहेत.