खासगी शाळांतील अडीच लाख मुले झाली सरकारी शाळांत दाखल !

358

आता खासगी शाळेतील अडीच लाख मुलं सरकारी शाळेकडे वळल्याची माहिती समोर आली आहे.


प्रभाकर कोळसे हिंगणघाट ( वर्धा)
६ वर्षांमध्ये सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तर अडीच लाख विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून सरकारी शाळेकडे वळले आहेत. कोरोना काळात खासगी शाळांनी आकारलेल्या अवास्तव फी आणि इतर खर्च यामुळे अनेक पालक त्रस्त झाले होते.
अनेक खासगी शाळांनी फीमध्ये सूट दिली नव्हती. त्यामुळे अनेक पालकही खासगी शाळांच्या व्यवस्थापनावर नाराज आहेत. त्यामुळे बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना आर्थिक अडचणींमुळे पुन्हा एकदा सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील तब्बल अडीच लाख विद्यार्थी सरकारी शाळेकडे वळले आहेत. दिल्लीतील विद्यमान शासनाचे शिक्षण विभागाने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळत आहेत. अनेक सरकारी शाळांकडे आज पालक आणि मुलं स्वत: वळत आहेत. दिल्लीतील विद्यमान शिक्षण विभागाचा कित्ता राज्याच्या शिक्षण विभागाने गिरवीण्याची गरज असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करताहेत.सुत्राचे माहिती नुसार दिल्लीचे शिक्षण विभागाचे अभ्यासाकरीता राज्याचे शिक्षण विभागाने अभ्यास गट नेमला असुन .अभ्यास गटाने अहवाल सादर केल्यानंतर राज्यातही खासगी शाळांतील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळतील असा आशावाद शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी बोलुन दाखवले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here