शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांनी आज सभागृहात शिक्षक भरती संदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली.
राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे,लवकरच या भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.जिथे शिक्षकांची संख्या कमी आहे तिथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल व उर्वरित रिक्त पदावर शिक्षक भरती केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.