Site icon ज्ञानसंवाद

ह्या जिल्ह्यातील एवढ्या झाल्या शाळा सुरू! विद्यार्थ्यांचा कसा मिळतो आहे प्रतिसाद; शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: राज्यातील कोरोना पासून मुक्त झालेल्या गावांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांनी शासन निर्णय काढला असून त्यानुसार राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याबाबत मा. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात ट्विटर द्वारे माहिती दिली आहे. १५ जुलै रोजी राज्यातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गामध्ये जिल्ह्यातील एकुण विद्यार्थी संख्या व त्यापैकी किती शाळा उघडल्या तसेच जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या व त्यापैकी किती विद्यार्थी शाळेत आले. याची संपूर्ण माहिती मा. वर्षा गायकवाड यांनी ट्विट द्वारे शेअर केली आहे

.

राज्यात एकूण १९९९७ शाळा असून त्यापैकी ५९४७ शाळा उघडल्या आहेत. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये एकूण ४५,०७,४४५ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी ४,१६,५९९ एवढे विद्यार्थ्यांनी शाळेत आपली उपस्थिती नोंदविली आहे. अशी माहिती माननीय वर्षा गायकवाड यांनी दिली आहे

Exit mobile version