Site icon ज्ञानसंवाद

राज्यात कनिष्ठ महाविद्यालय ११ वी प्रवेश प्रक्रिया ?काय आहेत शिक्षण संचालक यांचे आदेश

प्रभाकर कोळसे(हिंगणघाट):-

राज्यातील सन२०२१-२२ अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही.तथापी राज्यात काही उच्च माध्यमिक विद्यालयानी अकरावी ची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे गुगल फार्म द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण होऊ शकतो.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती कळविण्यात येईल तत्पुर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून आपले स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याबाबत राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी कळविले आहे

Exit mobile version