Site icon ज्ञानसंवाद

अखेर इयत्ता दहावीची परीक्षा रद्द!

हिंगणघाट (२०/४) :-राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार याची विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असतानाच, राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी नुकतेच ट्विट सुद्धा केले आहे.मात्र बारावीच्या परीक्षा यथावकाश होणार असल्याची माहिती आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताच बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
प्रभाकर कोळसे
हिंगणघाट

 

Exit mobile version