Site icon ज्ञानसंवाद

येवल्यातील साहित्य संमेलनात कथा स्पर्धा आणि काव्य स्पर्धेचे आयोजन

(नाशिक)-

येवल्यात प्रथमच २५ व २६ नोव्हेंबर २०२३ मध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनात नवोदित कवी आणि कथा लेखकांकारिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ही स्पर्धा सर्व वयोगटाकरिता त्याच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहे.
कथा स्पर्धा – महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी नवोदित कथा लेखकांना संधी मिळावी हा या कथा स्पर्धा आयोजनाच्या मागील उद्देश आहे.
१) कथा लेखकाचा कथा संग्रह प्रकाशित झालेला नसावा
२) कथा पूर्णपणे स्वतंत्र असावी
३) स्पर्धेसाठी कथेची टंकलिखित प्रत पाठवावी.
४) कथा फुलस्केप पेपरवर समास सोडून टाइप केलेली असावी
५) कथा ईमेलने देखील पाठवता येईल.मात्र युनिकोडमध्ये टाइप केलेली असावी.
६)कथा तीन हजार शब्दांपर्यंत असावी. कथेची गरज असेल तर एक हजार शब्द वाढले तरी चालतील
७) पाकिटावर येवला सहित्य संमेलन कथा स्पर्धा असा स्पष्ट उल्लेख असावा.
८)परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
९) पहिल्या तीन क्रमांक पटकवणाऱ्या कथाकारांना साहित्य संमेलनात कथा- कथनाच्या कार्यक्रमात निवड
झालेली कथा सादर करावयाची आहे.
१०) कथेच्या प्रथम पानावर स्वतःचे नाव, संपूर्ण पत्ता,दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर , whatsap नंबर
स्वतंत्र असल्यास नमूद करावा.
११) कथा १५ सप्टेबर २०२३ पर्यंत पोहचतील या बेताने पाठवाव्यात.
१२) कथेचा निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर केला जाईल.
१३) प्रथम क्रमांक रु.२५००/- द्वितीय क्रमंक १५००/- आणि तृतीय क्रमांक १०००/- आणि स्मृतीचिन्ह
देऊन साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येईल. (प्रवास खर्च दिला जाणार नाही)
१४) कथा पाठवण्याचा पत्ता – महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, येवला “सत्यशोधक” प्लॉट न. ४४, पटेल
कॉलनी, विंचूर रोड, येवला, जि.नाशिक संपर्क- ९४२२७५७६३९ / ०२५५९ २९९३८७
मेल – sahityaparishadyeola@gmail.com
स्पर्ध्येत सहभागी व्हा आणि बक्षिसाचे मानकरी होऊन स्वतःची कथा सादर करण्याचे मानकरी व्हा.

काव्य स्पर्धा

कवीचा काव्य संग्रह प्रकाशित झालेला नसावा
२) कविता पूर्णपणे स्वतंत्र असावी
३) स्पर्धेसाठी कवितेची टंकलिखित प्रत पाठवावी.
४) कविता फुलस्केप पेपरवर समास सोडून टाइप केलेली असावी
५) कविता ईमेलने देखील पाठवता येईल.मात्र युनिकोडमध्ये टाइप केलेली असावी.
७) पाकिटावर येवला सहित्य संमेलन काव्यस्पर्धा असा स्पष्ट उल्लेख असावा.
८)परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
९) पहिल्या तीन क्रमांक पटकवणाऱ्या कवींना साहित्य संमेलनात निवड
झालेली कविता सादर करावयाची आहे.
१०) कथेच्या प्रथम पानावर स्वतःचे नाव, संपूर्ण पत्ता,दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर , whatsap नंबर
स्वतंत्र असल्यास नमूद करावा.
११) कथा १५ सप्टेबर २०२३ पर्यंत पोहचतील या बेताने पाठवाव्यात.
१२) काव्य स्पर्ध्येचा निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर केला जाईल.
१३) प्रथम क्रमांक रु.२५००/- द्वितीय क्रमंक १५००/- आणि तृतीय क्रमांक १०००/- आणि स्मृतीचिन्ह
देऊन साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात येईल. (प्रवास खर्च दिला जाणार नाही)
१४) कविता पाठवण्याचा पत्ता – महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, येवला “सत्यशोधक” प्लॉट न. ४४,
पटेल कॉलनी, विंचूर रोड, येवला, जि.नाशिक संपर्क- ९४२२७५७६३९ / ०२५५९ २९९३८७
मेल – sahityaparishadyeola@gmail.com
स्पर्ध्येत सहभागी व्हा आणि बक्षिसाचे मानकरी होऊन स्वतःची कविता सादर करण्याचे मानकरी व्हा

Exit mobile version